मंगलवार, 23 अगस्त 2011

महागाईवर मात सावंगी मेघेतील कथा


भिमाई स्वयं सहायता महिला बचत गट सावंगी मेघे,वर्धा येथील गटामध्ये १४ महिलांचा सहभाग आहे. गटातील नियमीत बचत, महिलांचा सहभाग बघुन वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वर्धा शाखने गटाला रुपये १०००० चे कर्ज दिले. त्याचा उपयोग गटातील महिलांनी कुटुंबातील आर्थिक गरजा भागविण्यासाठी केला. दरमहा बँकेने ठरवुन दिलेल्या किस्तीने कर्जाची परतफेड नियमित केली. त्यामुळे गटाप्रती बँकेचा विश्वास वाढला. 

गटातील महिलांनी एकत्र बसुन गटाचा व्यवसाय करण्या संदर्भात चर्चा केली. त्यातुन अनेक अडचणी पुढे आल्या. व्यवसाय सुरु केला तर मार्केटींग करावे लागले. सर्वांना सहभागी होऊन एकत्र काम करावे लागेल व त्यातुन मिळालेला नफा वाटुन घ्यावा लागेल. त्यामुळे सर्वांनी आपला दर महिन्याला लागणारा खर्च कमी करण्या संदर्भात चर्चा करुन वर्षभरात लागणारे धान्य विकत घेण्याचा निर्णय घेतला. 

बाजारभाव कमी असतो अशा वेळेस धान्य विकत घेऊन सर्वांना कमी किमतीत वाटुन द्यावे. त्यातुन दरवेळेस होणारी भाववाढ यातुन सर्व सभासदांना सुटका मिळेल. तसेच वेळेवर धान्य खरेदी करिता सभासदांकडे पैसे नसतात, त्यांना मदत होईल. सर्वानुमते गटात ठराव पारित करुन बँकेकडे सादर केला व धान्य विक्रीचा व्यवसाय निवडला. बँकेचे गटाची व्दितीय प्रतवारी करुन गटाला व्यवसायाकरिता रुपये ६००००/- चे कर्ज मंजुर केले.

गटाने बँकेकडून मिळालेल्या कर्जातून बाजारात जाऊन ठोकमध्ये धान्य, तेल खरेदी केले व गरजेनुसार कमी भावात सभासदांना वाटून दिले. त्यातुन सभासदांचा कुटुंबाला दरमहा होणारा खर्च वाचला, तसेच बाजार भावापेक्षा कमी किंमतीत धान्य व तेल मिळाल्यामुळे कुटुंबाला नफा झाला. सर्व सभासदांनी गटाकडून घेतलेल्या मालाची रक्कम त्यांच्या नावे कर्ज स्वरुपात दाखविण्यात आली. ठरविल्याप्रमाणे दरमहा रुपये २००/- कर्ज व व्याज परत करतात. गटाकडे जमा झालेल्या रकमेतुन बँकेची परतफेड सुरु आहे. अशाप्रकारे गटाने बँकेचा विश्वास संपादन केलेला आहे गटाने घेतलेल्या कर्जावर माविमकडून ७ टक्के व्याजाचा परतावा गटाला नियमित मिळतो. अशाप्रकारे भिमाई गटाने धान्याच्या पुरवठा करुन महागाईवर मात केलेली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें