मंगलवार, 23 अगस्त 2011

संघर्षमय जीवनातून नवचैतन्य


मी अर्चना गणवीर समुद्रपूर तालूक्यापासून १७ कि.मी. अंतरावर असलेल्या गिरड या गावामध्ये राहते. माझा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर गावामध्ये झाला. आमच्या भावंडामध्ये मी सर्वात लहान, वडील व्यसनी, कुटूंबाचा संपुर्ण भार आईवर होता. मोठ्या बहिण्ीचे लग्न झाले. आई घरी शिवणकाम करायची, मी सातव्या वर्गापासून आईच्या कामाला मदत करायला सुरुवात केली. मी आईच्या कामात मदत करता करता पदवी पर्यंतचे शिक्षण व शिवणकाम शिकले.घरच्या लोकांनी माझे लग्न उमरेड तालुक्यातील एका मुलाशी करुन दिले.
माझा नवरा सारा पगार दारुत घालवायचा, मला मारण्याकरीता नवनवीन कारणे शोधायचा.मी मरत मरत जगत होती, पण नंतर मी ठरवलं, माझ्या चांगल्या आयुष्यासाठी आणि भविष्यासाठी मलाच कंबर कसावी लागेल. माणुस म्हणुन चांगलं जीवन जगण्याचा मलाही अधिकार आहे. माझ्या अंगी शिवणकामाचं चांगलं कौशल्य होतं. मनाशी निर्धार व स्त:वर आत्मविश्वास होता.मी व्यसनी नव-यास सोडले
गिरडला एका संस्थेमध्ये काम करायला सुरुवात केली. तिथलं काम संपवुन घरी कपडे शिवण्यास सुरुवात केली. पैसे गोळा व्हायला लागले. पण तिथेही फसवणुक झाली. संस्था बंद पडली, पण माझा शिवणकाम व्यवसाय चांगला चालत होता. एकट्या बाईला विरोधही खुप असतात. मला इथुन काढण्याचा खुप प्रयत्न केला. पण मी आपल्या मनाशी खंबीर होते. स्वत:चा टिकाव केला.
माझं लग्न झालं आहे. हे माहिती असुन सुध्दा मला एका मुलाने माझ्यातले गुण स्वभाव, साहसीवृत्ती बघुन मला पसंत केले. परंतु माझा लग्नाला विरोध होता. कारण एकदा ठेच खाल्लेली होती. सगळे पुरुष सारखेच असतात, असा समज माझ्या मनात होता. मुलाकडील घरच्याचा विरोध होता, शेवटी एक दीड वर्षानंतर त्याचा हटट कमी न झाल्यामुळे मी विचार बदलला त्याचेशी विवाहबदध होण्याचे ठरवले. नशीबाने मला संधी दिली असावी आणि या संधीचा फायदा घेऊन मी माझ्या आयुष्याचं सोनं करण्याच ठरवल. 
मला बचत गटामध्ये सहभागी व्हायची खुप दिवसापासुन इच्छा होती. माविम सहयोगीनी ताईच्या माध्यमातुन ही संधी मला मिळाली. मी आम्रपाली गटाची सदस्य झाली. गावामध्ये केंद्र सरकारमान्य शिवणकला डिप्लोमा व पार्लरचा डिप्लोमा कोर्स चालविते. माझ्याकडे गरीब गरजु मुली शिकायला येतात. त्यांना मानसिक, आर्थिक आधार देण्याचं काम मी करीत आहे.
मी शिकविलेल्या काही मुलींचे व्यवसाय सुरु झालेले आहे. ते पाहून मनाला समाधान मिळते. आज माझ्याकडे असलेल्या कौशल्यामुळे माझी प्रगती झाली,आज. मी खुप समाधानी व आनंदी आहे.याचे खरे श्रेय .माविमचे आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें