शुक्रवार, 30 दिसंबर 2011

बचतीतून उभारली गेली मालमत्‍ता !

स्‍वर्ण जयंती ग्राम स्‍वरोजगार योजना, पंचायत समिती, हिंगणघाट जि.वर्धा अंतर्गत उत्‍कृष्‍ट काम करणा-या बचत गटामधील बसवेश्‍वर महाराज महिला बचत गट, डायगव्‍हाण येथील बचत गटाच्‍या कामाची तपासणी प्रतिभा पाटील यांनी केली. त्‍यात त्‍यांना या गटाची स्थिती चांगली असल्‍याचे पुन्‍हा सिध्‍द झाले. 
 
बसवेश्‍वर महाराज महिला बचत गटाची स्‍थापना फेब्रुवारी २००७ ला करण्‍यात आली. या गटात एकूण १४ सदस्‍य आहेत. त्‍यात अ.जा.चे १ व अ.ज. चे १३ सदस्‍य अंतर्भूत आहेत. या बचत गटामध्‍ये मासता रमेशराव काळे यांना अध्‍यक्ष व तुळशा किसनराव गटरी यांना सचिव म्‍हणून पद देण्‍यात आले. या गटाची बचत नियमीत स्‍वरुपाची असूऩ, या गटाचे व्‍यवहार बाबत खाते बँक ऑफ बडोदा, हिंगणघाट येथे होत असतात. 
या गटाने दुग्‍ध व्‍यवसायाची निवड केलेली असून, त्‍यासाठी त्‍यांनी बँकेकडून १ लाख २० हजार रुपये कर्ज घेतले व त्‍यांना १ लाख २० हजार अनुदान मिळाले. अशी त्‍यांची एकूण प्रकल्‍प किंमत २ लाख ४० हजार रुपये झाली. त्‍यांनी हे कर्ज १७ सप्‍टेंबर २००९ ला उचलले व त्‍यांचे हे कर्ज २१ जोनेवारी २०१० या वर्षी मंजूर करण्‍यात आले. त्‍यांना बँकेकडून वितरीत झालेले कर्ज म्‍हणून पहिला हप्‍ता ८२,००० रुपये व दुसरा हप्‍ता १८,००० रुपये देण्‍यात आले. त्‍यांची‍ वितरीत मालमत्‍ता १ लाख ४० हजार झालेली आहे. 

बसवेश्‍वर महाराज महिला बचत गटाने दुग्‍धव्‍यवसाय सुरु केल्‍यामुळे त्‍यांना गटात एकूण ३०,००० रुपये उत्‍पन्‍न मालमत्‍तेच्‍या स्‍वरुपात झाले व आर्थिक स्‍वरुपात २८,००० रुपये उत्‍पन्‍न झाले. बँकेकडून मिळालेले कर्ज १ लक्ष रुपये याची परतफेड त्‍यांनी केली असून, गटाकडे सध्‍या ७ म्‍हशी आहेत. 

गटाची मासिक सभा घेणे सुरु आहे. त्‍यांचे बँकेचे आर्थिक व्‍यवहार नियमित होत असून, बँकेकडून उचल केलेल्‍या कर्जाचा उपयोग गटाने उत्‍तम प्रकारे केला जातो. सर्व गटातील सभासदांचे सहकार्य चांगले आहे. 

गटाने केवळ व्‍यवसाय न देता व्‍यावसायिक मालमत्‍ता दिल्‍याने आता गटात आर्थिक सुबत्‍ता नांदत आहे. 


महान्‍यूज वरुन साभार 

बचतगटाने दिली सावकारापासून मुक्‍ती


          वर्धा जिल्‍ह्यातील देवळी पासून १८ कि.मी. अंतरावर असलेले बोपापूर वाणी वरुन आतमध्‍ये खर्डा हे गाव आहे. या गावाची एकूण लोकसंख्‍या ११२७ असूऩ, घर संख्‍या २६० आहे. गावामध्‍ये बचत गटाच्‍या बचतीचा कोणताही गंध नसताना त्‍या गावातील १७ बीपीएल महिलांनी एकत्र येवून बचतगट सुरु केला. बचत गटामध्‍ये १७ पैकी एकूण १० बीपीएल होत्‍या. सावकाराच्‍या पाशातून मुक्‍तता व्‍हावी व महिलांच्‍या गरजा भागवून काही बचत शिल्‍लक राहावी या उद्देशाने बचत गटाची स्‍थापना करण्‍यात आली. 

 
या महिलांना कोणाचेही मार्गदर्शन नसताना अंतर्गत व्‍यवहार सुरु केला व एका वर्षामध्‍ये मासिक बचत जमा करुन त्‍यामध्‍ये अंतर्गत कर्जाचा व्‍यवहार करुन पूर्ण परतफेड करण्‍यात महिला यशस्‍वी झाल्‍या. त्‍यानंतर ग्रामपंचायतमध्‍ये स्‍वस्‍त धान्‍याचे दुकान व रॉकेलच्‍या व्‍यवसायासाठी त्‍यांनी त्‍यांच्‍या गटाचा फॉर्म भरला व १ एप्रिल २००८ पासून त्‍यांच्‍या कार्याला गती मिळाली. २००८ मध्‍ये ग्रेडेशन झाले व त्‍याच वर्षी त्‍यांना ५०,००० रु. खेळते भांडवल मिळाले. त्‍यापैकी त्‍यांनी १०,००० रुपये अनुदान मिळाले व उरलेले ४०,००० रुपये परतफेड केले. त्‍यानंतर त्‍यांना २००९ मध्‍ये स्‍वस्‍त धान्‍याचे दुकान व केरोसीन याचा परवाना मिळाला. 

आदिवासी रोजगार हमी महिला बचतगट यांनी मिळालेल्‍या पैशांमधून त्‍यांनी रॉकेलचे ड्रम, वजन काटा, माप हे साहित्‍य खरेदी करुन सीताबाई रामाजी कौराती यांच्‍या घरी रुम भाड्याने घेऊन व्‍यवसाय सुरु केला. त्‍यांना ८०० रुपये भाडयापोटी गटाच्‍या महिला देतात. त्‍यानंतर २०१० मध्‍ये त्‍यांना २ लाख रुपये मंजुर झाले. त्‍यामधून पहिला टप्‍पा एक लक्ष रुपये मिळाला त्‍यामधून त्‍यांनी ४०,००० रुपये परतफेड केली.त्‍यामधून त्‍यांना दुसरा टप्‍पा मिळायचा आहे. 

स्‍वस्‍त धान्‍याचे दुकान यामध्‍ये त्‍यांच्‍याकडे अंत्‍योदय बीपीएल, ओपीएल, शाळा, अंगणवाडी इत्‍यादी प्रकारामधून त्‍यांना धान्‍य वाटप करायचे आहे. तसेच त्‍यांचा स्‍वस्‍त धान्‍य दुकानाचा स्‍टॉक रजिस्‍टर व विक्री रजिस्‍टर इत्‍यादी रेकार्ड आहे. 
आदिवासी रोजगार हमी महिला बचत गट या गटामध्‍ये कामाची पध्‍दत म्‍हणजे रोज २ महिला, ५० रुपये रोजाप्रमाणे धान्‍य वाटप करतात. त्‍यांची वेळ ठरलेली आहे. सकाळी ९ ते ५ पर्यंत या महिला काम करतात.गटामध्‍ये सर्व महिला एकजुटीने काम करतात.त्‍यामुळे हा गट व्‍यवस्थित चालू आहे.   

 महान्‍यूज वरुन साभार




बचतगटाने दिले ग्रामपंचायत सदस्‍यपद

बचत गटाच्‍या चळवळीने केवळ उदरनिर्वाहाचे साधन मिळाले असे नव्‍हे तर ग्रामपंचायत सदस्‍याचे पदही मिळाले अशी ही यशोगाथा आहे वर्धा जिल्‍ह्यातील मातोश्री स्‍वयंसहायता महिला बचतगटाची.हा बचतगट येळाकेळी गावात आहे. 
२००५ साली गावातील १३ महिलांनी एकत्र येवून हा स्‍वयंसहायता गट स्‍थापन केला. साधारण १ वर्षाने ऑगस्‍ट २००६ मध्‍ये गटाला कर्ज आणि अनुदान असे प्रत्‍येकी ७ हजार, एकूण चौदा हजार रुपये प्राप्‍त झाले. 

या रकमेतून काही निधी शेळीपालनातून मिळालेले उत्‍पन्‍न व वैयक्तिक कर्जाचे व्‍याज या माध्‍यमातून पूर्ण कर्ज परत केले. नोव्‍हेंबर २००८ मध्‍ये गटाला १ लाख ८० हजार कर्ज मंजूर करण्‍यात आले. त्‍यात त्‍यांनी भांडवल वृध्‍दीसाठी याचा वापर केला. गावात या कामाची सकारात्‍मक चर्चा झाल्‍यावर अंगणवाडीचे अन्‍न शिजविण्याचे काम २ वर्षापूर्वी गटाला मिळाले. या दोन्‍हीच्‍या उत्‍पन्‍नावर अलाहाबाद बँकेचे सर्व कर्ज परत करण्‍यात आले असे गटाच्‍या अध्‍यक्षा निर्मला गव्‍हाळे यांनी सांगितले. आज गटाकडे शेळ्याही आहेत आणि अंगणवाडीचेही काम सुरु आहे.

गटाच्‍या कामाची ओळख निर्माण झाल्‍याने निर्मला गव्‍हाळे या ग्रामपंचायत सदस्‍य म्‍हणूनही निवडून आल्‍या. स्‍वयंसिध्‍दा होण्‍यासोबतच राजकारणातही संधी मिळण्‍याची आता सर्वत्र चर्चा आहे. 


महान्‍यूज वरुन साभार