शुक्रवार, 30 दिसंबर 2011

बचतगटाने दिले ग्रामपंचायत सदस्‍यपद

बचत गटाच्‍या चळवळीने केवळ उदरनिर्वाहाचे साधन मिळाले असे नव्‍हे तर ग्रामपंचायत सदस्‍याचे पदही मिळाले अशी ही यशोगाथा आहे वर्धा जिल्‍ह्यातील मातोश्री स्‍वयंसहायता महिला बचतगटाची.हा बचतगट येळाकेळी गावात आहे. 
२००५ साली गावातील १३ महिलांनी एकत्र येवून हा स्‍वयंसहायता गट स्‍थापन केला. साधारण १ वर्षाने ऑगस्‍ट २००६ मध्‍ये गटाला कर्ज आणि अनुदान असे प्रत्‍येकी ७ हजार, एकूण चौदा हजार रुपये प्राप्‍त झाले. 

या रकमेतून काही निधी शेळीपालनातून मिळालेले उत्‍पन्‍न व वैयक्तिक कर्जाचे व्‍याज या माध्‍यमातून पूर्ण कर्ज परत केले. नोव्‍हेंबर २००८ मध्‍ये गटाला १ लाख ८० हजार कर्ज मंजूर करण्‍यात आले. त्‍यात त्‍यांनी भांडवल वृध्‍दीसाठी याचा वापर केला. गावात या कामाची सकारात्‍मक चर्चा झाल्‍यावर अंगणवाडीचे अन्‍न शिजविण्याचे काम २ वर्षापूर्वी गटाला मिळाले. या दोन्‍हीच्‍या उत्‍पन्‍नावर अलाहाबाद बँकेचे सर्व कर्ज परत करण्‍यात आले असे गटाच्‍या अध्‍यक्षा निर्मला गव्‍हाळे यांनी सांगितले. आज गटाकडे शेळ्याही आहेत आणि अंगणवाडीचेही काम सुरु आहे.

गटाच्‍या कामाची ओळख निर्माण झाल्‍याने निर्मला गव्‍हाळे या ग्रामपंचायत सदस्‍य म्‍हणूनही निवडून आल्‍या. स्‍वयंसिध्‍दा होण्‍यासोबतच राजकारणातही संधी मिळण्‍याची आता सर्वत्र चर्चा आहे. 


महान्‍यूज वरुन साभार 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें