सोमवार, 3 अक्तूबर 2011

पोषण आहारातून समृध्दी


सोमवार, ३ ऑक्टोबर, २०११

वर्धा जिल्ह्यात ग्रामीण भागात आपल्या परिश्रमाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासोबतच स्वत:चा आर्थिक उंचावणारे अनेक बचतगट कार्यरत आहेत. यातील एक बचतगट म्हणजे वर्धा तालुक्यातील आलोडी गावाचा जागृती महिला बचतगट होय.

दारिद्रय रेषेखालील महिलांचे जीवनमान सुखी व्हावे या उद्येशाने ऑगस्ट २००७ मध्ये गटाची सुरुवात झाली. दहा महिलांच्या या गटात आठ महिला दारिद्रय रेषेखालील आहेत. यांनी बचतीच्या माध्यमातून बँकेच्या मदतीने नुसता गृहोद्योग केला असे नव्हे तर अनेक सामाजिक उपक्रमांमधून गावात आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.

बँकेकडून कर्ज घेण्यासाठी डीआरडिए चे विस्तार अधिकारी डी.के.वरधणे यांची मदत झाली. त्यांना वर्धा येथील भारतीय स्टेट बँकेने १ लाख रुपयांचे कर्ज दिले. आपल्या विविध कामाच्या जोरावर गटाने गेल्या ३ वर्षात ८५ हजार रुपये कर्जाची परतफेड केली असून, आज मितीस गटाकडे ४० हजार रुपयांचे खेळते भांडवल उपलब्ध आहे.

या गटाचे वैशिष्ट्य म्हणजे निर्मल ग्राम योजनेत सहभाग. प्रत्येक सदस्याच्या घरात शौचालय असलेच पाहिजे असा निर्णय घेऊन तो त्यांनी पार पाडला. या गटाला गावात शालेय पोषण आहार पुरविण्याचे काम मिळाले आहे. त्या माध्यमातून मुलांना सकस आहार आणि गटाला आर्थिक स्थैर्य लाभले आहे.

  • प्रशांत दैठणकर

  • कोई टिप्पणी नहीं:

    एक टिप्पणी भेजें